व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

पोस्टाने दोन लाख रुपये उध्दव ठाकरेंना पाठवा

0

नांदेड click2ashti शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उध्दव ठाकरे यांनी बंजारा समाजाच्या भावना दुखविल्या प्रकरणी बंजारा समाजचे कार्यकर्ते मोहन चव्हाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन ठाकरेविरोधात गुन्हा नोंदवावा अशी मागाी केली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. खंडपीठाने याचिकेवर सुनावणी करताना याचिकाकर्त्यांला दोन लाख रुपये दंड ठोठावला असून हे दोन लाख रुपये पोस्टाने किंवा स्वत: जावून उध्दव ठाकरेंना द्यावे असेही खंडपीठाने म्हटले आहे.या निर्णयानंतर चव्हाण यांनी उध्दव ठाकरे यांना दोन लाख रुपयांचा डीडी काढून पाठिवला आहे.
उद्धव ठाकरे यांनी बंजारा समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याची याचिका करणाऱ्या मोहन चव्हाण यांना औरंगाबाद खंडपीठाने दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. बंजारा समाजाचे महंत यांनी उद्धव ठाकरेंना प्रसाद आणि विभूती दिली. ठाकरे यांनी प्रसाद आणि विभूती स्वीकारल्यानंतर ती शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीकडे दिली. त्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नांदेडमधील डॉ. मोहन चव्हाण कोर्टात याचिकेद्वारे केली होती. यावर खंडपीठाने निर्णय दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.