व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आपल्या समाजासाठी, लेकरासाठी आता उलथापालथ करावीच लागणार : मनोज जरांगे

नारायणगडावर मराठ्यांचा अभूतपूर्ण दसरा मेळावा

0

बीड (श्रीक्षेत्र नारायणगड) click2ashti समाजाने आपल्या लेेकरांना सांभाळावं, त्यांच्यावर कलंक लागू देऊ नका. समाज सांभाळा, लेकरं सांभाळा. चौदा महिने झाले आरक्षणाच्या बाबतीत एकही निर्णय झाला नाही. आम्हाला कायम झुलवत ठेवलयं. आता आपल्याकडे पर्याय राहिला नाही. तुमच्या लेकरासाठी, समुदायासाठी आिण शेतकऱ्यांसाठी यावेळेस आपल्याल उलथापालथ करावीच लागणार आहे अशी भूमिका मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.
श्रीक्षेत्र नारायणगडावर मराठ्यांचा अभूतपूर्व पहिला दसरा मेळावा आज पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महंत शिवाजी महाराज उपस्थित होते. यावेळी महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत केले. दसरा मेळाव्यासाठी आठ ते दहा दिवसांपासून पंचक्रोशीतील समाज बांधव कामाला लागला होता. अनेकांनी वेगवेगळ्या पध्दतीने दसरा मेळाव्यासाठी मदत केली. प्रत्येक समाजा बांधव मेळाव्यासाठी तन मन धनाने तयारीला लागला होता. आज झालेल्या दसरा मेळाव्याला बीडसह राज्यभरातून दहा लाखांहून अधिक मराठा समाज बांधव उपस्थित होता. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, वारकरी सांप्रदायाने, हिंदू धर्माने, कायदा, संविधानाने अन्यायािवरुध्द लढण्याची शिकवण दिली आहे. न्यायासाठी उठाव करण्याची शिकवण दिली आहे. मग आमचं काय चुकलं हे कोणीही सांगत नाही. आम्हीही आमच्यावर झालेल्या अन्यायाविरुध्द लढत आहोत. चौदा महिने झाले आरक्षणाची एकही मागणी मान्य झाली नाही. मला संपविण्यासाठी अनेक षडयंत्र रचले, मला पूर्णपणे घेरले आहे. गडावरुन एक शब्दही खोटं बोलणार नाही. मला त्रास झाला तर माझा समाज रात्रंदिवस ढसाढसा रडतो. मला तुमच्या डोळ्यात पाणी पहायचं नाही. तुमच्या मनात जे आहे, तुमची जी इच्छा आहे, तेच आपण करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. येथून जाताना आनंद घेऊन जा, आणि दुख: सोबत न्या, असे आवाहन देखील त्यांनी केले. वेळप्रसंगी मरण स्वीकारेल मात्र, तुमची मान घाली घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आचारसंहिता लागल्यानंतर मुख्य भूमिका स्पष्ट करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हटले आहे. गेल्या 14 महिन्यात मराठा समाजाची एकही मागणी मान्य केली नाही. एवढा द्वेष कशासाठी? आता 17 जाती घालताना गोरगरीब ओबीसींचा विचार का केला नाही का? अशी विचारणा मनोज जरांगे पाटील यांनी नारायणागडावर झालेल्या भव्य दसरा मेळाव्यातून केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.