व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

ज्याची पत आणि ऐपत नाही अशा लोकांसाठी मी राजकारणात : पंकजा मुंडे

एखादा नवीन मेळावा सुरू करत पंकजाताईंची ताकद कुणी संपवू शकत नाही : धनंजय मुंडे

0

पाटोदा click2ashti बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील लोकांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केले आहे. अनेकांनी माझ्यासाठी जीव दिला आहे. किती हे प्रेम.इथल्या लोकांवर मी पोटच्या लेकरापेक्षा जीव लावते, आणि आई वडिलांपेक्षा जास्त तुम्ही माझ्यावर प्रेमा करता. निवडणुकीत माझा पराभव झाला तरीही तुमचे माझ्यावरील प्रेम तसुभही कमी झाले नाही.ज्याची पत आणि ऐपत नाही अशा लोकांसाठी मी राजकारणात आहे असे प्रतिपादन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले. तर एखादा नवीन मेळावा सुरू करत पंकजाताईंची ताकद कुणी संपवू शकत नाही असे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडवर आयोजित दसरा मेळाव्यात त्या बाेल होत. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंड, प्रितम मुंडे, मोनिका बोर्डीकर, सुजय विखे पाटील, सुरेश धस, लक्ष्मण हाके आदी उपस्थित होते. यंदाच्या दसरा मेळाव्याला प्रथमच पालकमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. मुंडे बहिण, भाऊ एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्या प्रत्येक वाईट काळात ही जनता माझ्यासोबत राहिली आहे. यामुळे मी माझ्या मुलाला नेहीम सांगते की तुझ्या पेक्षा जास्त मला माझी जनता आवडते.ती प्रिय आहे. माझ्यासाठी तुम्ही जीव देता यापेक्षा आजुन काय प्रेम पाहिजे. आजच्या मेळाव्याला आठरा पगड जातीचे लोक राज्यभरातून येतात. मी माझ्या ऊसतोड कामगारांचे जीवन बदलल्या शिवाय शांत बसणार नाही. महादेव जानकर माझे बंधू आहेत आणि त्यांच्या बाजूला बसलेले गोंडस लेकरू लक्ष्मण हाके असे म्हणत त्यांचे कौतुक केले. यावेळी धनंजय मुंडे यांनी 2 वर्षे जमले नाही पण मी कधी दसरा मेळावा सुरू केला नाही. मनात सुद्धा आले नाही, कारण ज्यांना जो वारसा दिला तो त्यांनी पार पाडावा. माझ्या बहिणीला जेवढा आज आनंद होतोय त्या पेक्षा जास्त जमलेल्या लोकांना झाला आहे. असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.