व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

केजरिवाल यांच्या डोक्यात पैशाची आणि सत्तेची हवा : आण्णा हजारे

0

नगर I प्रतिनिधी
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा पराभव झाला तर भाजपची एकहाती सत्ता आली. यावर ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी भाष्य केले. अरविंद केजरिवाल यांनी दारुवर लक्ष केंद्रीत केलं. त्यांच्या डोक्यात पैशाची, सत्तेची हवा गेली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला, असे अण्णा हजारे म्हणाले.

आण्णा हजारे म्हणाले की, आताचा मतदार हा जागरुक
“मी नेहमी म्हणतो की कोणत्याही उमेदवाराकडे स्वच्छ विचार, स्वच्छ चारित्र्य आणि त्यागाची भावना असायला हवी. या गुणांवरूनच मतदारांचा त्या उमेदवारावर विश्वास बसतो. ज्यावेळेला ते दारुचे दुकानं काढायची, दारुचे परवाने द्यायचे हे विचार जेव्हा त्यांच्या मनात आले त्यावेळेला ते डाऊन झाले. जागरुक मतदार हा आजच्या लोकशाहीचा आधार आहे. आताचा मतदार हा जागरुक झालेला आहे. हे लोक दारुचा विचार करतात हे पाहिलं आणि त्यांनी नकार दिला. त्यामुळे ते डाऊन झाले”, असे अण्णा हजारे म्हणाले. ज्यावेळी पक्ष नव्हता आणि ते जेव्हा माझ्यासोबत आले तेव्हा मी त्यांना सुरुवातीपासून जनतेची सेवा करा असं सांगत आलो. फळाची अपेक्षा न करता केलेले कर्म ही ईश्वराची पूजा असते. अशीच पुजा तुम्ही करत राहा. तुम्हाला कोणी हटवणार नाही. सुरुवातीला बरं वाटलं. नामधाऱ्यांच्या डोक्यात दारुचे दुकान, दारुचे लायसन्स शिरले आणि घोटाळा झाला. त्यानंतर मग दारु डोळ्यासमोर आली, धन आले, दौलत आली. मग सगळं बिघडलं”, असेही अण्णा हजारेंनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.