काँग्रेस-आप एकत्र असते जर आज दिल्लीत चित्र वेगळे असते : संजय राऊत
मुंबई I प्रतिनिधी
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा गड ढासळला आणि भाजपची सत्ता आली. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य करत दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेस आिण आप एकत्र आले असते तर विजयाचं चित्र वेगळं दिलसं असतं. दोन्ही पक्ष एकत्र लढले असते तर भाजपचा पराभव अटळ होता असे राऊत म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला २४ जागांवर समाधान मानावे लागले तर पक्ष प्रमुख अरविंद केजरिवाल यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. यावर संजय राऊत म्हणाले की, आप आणि काँग्रेस यांचा भाजप विरोधक आहे. भाजपला हरवण्यासाठी आप आणि काँग्रेस स्वतंत्र लढत आहेत. हे दोन्ही पक्ष एकत्र असते तर भाजपचा पराभव झाला असता असा दावा राऊतांनी केला. भाजपने महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीत राबविला असेही राऊत म्हणाले.