व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

नाशिकमध्ये जागतिक कृषी महोत्सवाचे पंकजाताई मुंडेंच्या हस्ते थाटात उदघाटन

0

नाशिक । प्रतिनिधी
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खुप मोठी आहे; त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आहे. लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात, त्यामुळे गुणांचा वारसा स्विकारुन ते माझ्याशी जोडले गेले अशा शब्दात राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशूसंवर्धन मंञी ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
श्री स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरीटेबल ट्रस्ट, दिंडोरी आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक कृषी महोत्सवाचे उद्धाटन आज ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. धुळ्याच्या खासदार शोभाताई बच्छाव, आ. सिमाताई हिरे, अण्णासाहेब मोरे, लक्ष्मण सावजी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. पंकजाताई म्हणाल्या, मुंडे साहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या जन्मापासुन काम केले आणि तो पक्ष खऱ्या अर्थाने त्यांनीच उभा केला. महाराष्ट्रात भाजप रुजविण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खुप मोठी आहे. एवढे प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील एवढं प्रेम लोकं त्यांच्यावर करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.