व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आ.धस यांनी पुन्हा धनंजय मुंडेंवर डागली तोफ

0

आष्टी । प्रतिनिधी
भाजप आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे पत्रकार परिषद घेत पिकविमा घोटाळ्यावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा घोटाळ्याचे आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी मूळ बाबी बदलून नॅनो युरिया, नॅनो डीएपीबाबत चर्चा केली असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. याबाबतचा प्रस्ताव महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंडे यांनी पाठवले असल्याचेही सुरेश धस यांनी सांगितले आहे.

सुरेश धस म्हणाले, 6 मार्च 2023 रोजी धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती. त्यात मूळ बाबी बदलून नॅनो युरिया, नॅनो डीएपीबाबत चर्चा केली. 12 मार्च रोजी तातडीने नॅनो युरिया, नॅनो डीएपीबाबत जीआर काढण्यात आला. 12 मार्चला प्रस्ताव पाठवला आणि लगेच 12 मार्च 2023 रोजी जीआर देखील मिळाला. राज्य पुरस्कृत कापूस सोयाबीन आणि इतर धन्य उत्पादकता वाढ ही महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक 11 मार्च 2022 या दिवशी हे महाविकास आघाडीचे सरकार असताना यावेळी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी या योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या तीन वर्षांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली. या योजनेत सोयाबीन व इतर गळीत पीक धान्य पद्धतीत चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ करणे, उत्पादकता वाढवणे, साठवणूक सुविधा, नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, संरक्षण देण्यासाठी तारण योजना, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते.

उद्दिष्टांच्या बाबी कोणत्या ठरवल्या तर पिकांची उत्पादकता वाढ व शेतकऱ्यांची क्षमता बांधणे, त्यात प्रात्यक्षिके, शेतकरी शाळा इत्यादि. यात कापूस 256 कोटी आणि सोयाबीन 294 कोटी असे 550 कोटी रुपये. बियाणे बळकटीकरण हे फक्त कृषी विद्यापीठाला देण्यासाठी कापसाला 15 कोटी, सोयबीनला 35 कोटी म्हणजे असे 50 कोटी असे देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.