व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

दहा वर्षांत शासकीय कार्यालयात केलेली एजंटगिरी बंद करा;अधिका-यांनो कुणाची कामे अडवू नका-आ.धस

आमसभेला नागरिकांनी मांडले गा-हाणे

0

आष्टी click2ashti-गेल्या दहा वर्षांत आष्टी मतदार संघात कोणत्याही योजनेचा लाभ घेयचा असेल तर प्रस्ताव बनविण्यापासून शिक्का मारेपर्यंत एजंट ची साखळी तयार झाली ही बंद करून,आता कोणत्याही शासकीय कार्यालयात वैयक्तीक लाभासाठी कुणाकडून पैसे घेतले तर कोणत्याच अधिका-यांची गया केली जाणार नाही जर कुणी अधिकारी पैसे मागतांना आढळून आला तर त्याची गाठ माझ्याशी असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.
गेल्या सात वर्षांनंतर पहिल्यांदाच आष्टी पंचायत समितीच्या प्रांगणात शनिवार (दि.१५) रोजी सकाळी ११.३० वा.आयोजित करण्यात आली होती.यावेळी अध्यक्षस्थानावरुन आमदार धस बोलत होते.यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर,उपविभागीय अधिकारी वसिमा शेख, तहसिलदार वैशाली पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमजान तांबोळी,सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, माजी पंचायत समिती सभापती बद्रीनाथ जगताप,आष्टी नगर पंचायत नगराध्यक्ष जिया बेग,एन.टी.गर्जे,परमेश्वर शेळके, यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,तालुक्यातील जनतेचे खुप दिवसांपासुन रखडलेत खुप झाले असुन न्याय ज्यांना मिळाला नाही.त्यांना न्याय मिळवून देण्कायासाठी ह्या आमसभेचे नियोजन करण्यात येते.

आमसभेत बोलतांना आ.सुरेश धस दिसत आहेत.

या आमसभेत दलित,आदिवासी,पारधी यासह रमाई आवास योजनेच्या कामे कुणीही अडवू नये तसेच अंगणवाडी,शाळा खोली यांची कामे आडवू नये,ज्या कार्यालयात जागा रिक्त असेल त्या जागांची माहिती देऊन रिक्त जागा भरण्यात येतील.३२९५ विहीरी रद्द करण्यात यावेत असे आदेश गटविकास अधिकारी यांना देण्यात आला आहे.तसेच गाई गोठाच्या बाबतीत जे गावे अतिशोशित गावात प्रामुख्याने मंजूर करावेत अशी सुचना आमदार धस यांनी सुचेना दिल्या आहेत.
माजी आमदार साहेबराव दरेकर म्हणाले,प्रत्येक गावचे तलाठी,ग्रामसेवक यांनी सजावर उपलब्ध राहावे,तलावातील पाणी पुढील दुष्काळाची दाहकता ओळखुन राखीव ठेवावे,
तसेच साबलखेड,आष्टी रस्त्यांचे काम लवकर पुर्ण करावे,पंचायत समितीमध्ये दलालांची संख्या जास्त झाली असल्याची खंत माजी आ.दरेकर यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने यांनी केले.सुरूवातीला पिंपरी घुमरीचे सरपंच यांनी ग्रामिण भागातील घरकुल साठी वाढीव अनुदान किती मिळणार व कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल टाकूनही आम्हाला दोन दोन वर्ष पट्टी मिळत नाही यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी यांनी आपण बाजार समितीची बदनामी न करता रितसर तक्रार द्या यावर आम्ही दोन दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.नगराध्यक्ष जिया बेग यांनी नगर पंचायत अंतर्गत शेतक-यांना वैयक्तीक लाभ विहीर,शेत तलाव या योजनेचा लाभ मिळत आहे.तरी याबाबत शासन दरबारी पाठपुरवठा करावा आणि शहरासाठी रूटी प्रकल्पातुन सोडलेले पाणि बंद करून आष्टी,मुर्शदपुर शहरासाठी हे पाणि राखीव ठेवा अशी मागणीही त्यांनी केली.या आमसभेत दादासाहेब पाडुंळे,परिवंत गायकवाड,यशवंत खंडागळे,अनिल ढोबळे,बापुराव ससाणे,युवराज शिंदे,शरद खांडवे, जाधव,रामा काशिद,बाळासाहेब बांगर, परमेश्वर घोडके,हनुमंत जेवे,बाळासाहेब खिळे,दत्तोबा वाडेकर, आत्माराम फुंदे,विजय डुकरे,अंगद शिंदे, शिवाजी गर्जे,धनजंय तरटे,सागर आमले यांच्यासह शेकडो नागरिकांनी आपले गा-हाणे या आमसभेत मांडले.
आमसभेत कारखेल तांडावरून हांडे घेऊन आल्या महिला
आयोजित करण्यात आलेल्या आमसभेत तालुक्यातील कारखेल खुर्दे येथील महिला आमच्या तांड्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नसून,आम्हला शिव रस्ता देण्यात यावा अशी मागणी या महिलांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.